ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा राजीनामा मंजूर केला असून, आता रमेश बैस (Ramesh Bais) हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते.
वादग्रस्त वक्तक्यांमुळे भगतसिंह कोश्यारी चर्चेत राहिले होते. त्यांच्याकडून वारंवार होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी यासंदर्भात पत्र लिहिले होते. अखेर आज राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. सुरुवातीला लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक वाचा : कोण आहेत नवे राज्यपाल रमेश बैस?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 13 राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.
रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
सीपी राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड
फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसाम
एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
अनुसुईया उइके, राज्यपाल, मणिपूर
शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ
ब्रिगेडियर (रिटायर्ड) बीडी मिश्रा, उपराज्यपाल, लडाख
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार