ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फडणवीस यांना पत्र लिहलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही ही निवडणूक बिनविरोध करण्याचं भाजपला आवाहन केलं होतं. त्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी खलबतं करुन या निवडणुकीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं. या प्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर मीडियाशी बोलताना ते म्हणाले, राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहलेलं पत्र हा स्क्रिप्ट’चा भाग होता. शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक 45 हजारांच्या मताधिक्मयाने जिंकणार होती. भाजपाने या मतदारसंघात सर्वे केला होता. पराभवाची चाहूल लागल्यामुळेच भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला.
अधिक वाचा : अन्याय होत असेल तर खडसेंनी कोर्टात जावं
दरम्यान, राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती. त्यामुळे त्यांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत (मंगळवार) तहकूब करण्यात आली आहे.