हवामान खात्याच्या पुनश्च रेड अलर्टमुळे आणखी तीन दिवस वाहतूक बंदचा निर्णय, अडकून पडलेल्या वाहनांची
प्रतिनिधी/चिपळूण
हवामान खात्याने जिल्ह्यासाठी १२ जुलैपर्यत रेड अलर्ट जाहीर केल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गेल्या आठवडाभरापासून बंद असलेल्या परशुराम घाटाचा बंद कालावधी रविवारपासून आणखी तीन दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाने घाटाबाबत आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला असून त्यावर कार्यवाही होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून अडकून पडलेल्या वाहनांची घाटातून सुरक्षितरित्या सुटका करण्याच्यादृष्टीने प्रशासन आणि महामार्ग विभाग चर्चा करीत आहे.
हे ही वाचा : हिंगोलीत ढगफुटी : कुरूंदा, किन्होळा गाव पाण्याखाली