प्रतिनिधी रत्नागिरी
बनावट दागिने असली असल्याचे सांगून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक करण्यात शहर पोलिसांना यश आल़े. या करवाईत एकूण 5 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आह़े. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 5 किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत़. या टोळीकडून अन्य काही ठिकाणी अशाच प्रकारे गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आह़े.
अधिक वाचा- Ratnagiri; चिपळुणात चोरट्याने फोडली पानटपरी
अटक करण्यात आलेल्या संशयित महिला या कमी किमतीत सोन्याचे दागिने घेणार का अशी विचारणा शहरातील काही महिलांजवळ करत होत्य़ा. मात्र कमी किमतीत दागिने का देत आहे ? याबाबत एका महिलेला संशय आल़ा. त्याची खबर या महिलेने शहर पोलिसांत दिली होत़ी. यावेळी शहर पोलिसांकडून सापळा रचून या महिलेला आणि तिच्या साथिदारांना अटक करण्यासाठी सापळा रचल़ा. त्यानुसार शनिवारी दुपारी दागिने घेवून एक पुरूष मारूती मंदीर परिसरात आल़ा. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी या संशयिताच्या मुसक्या आवळल्य़ा.
ताब्यात घेण्यात घेतलेल्या संशयिताकडे असलेले दागिने हे बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल़े. यावेळी त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता त्याच्या टोळीमध्ये दोन महिला व 3 पुरूष असल्याची कबुली त्याने दिल़ी. यानंतर पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतल़े. शनिवारी रात्री उशिरा या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आह़े