विजेचा खेळ खंडोबा सुरूच
संगमेश्वर प्रतिनिधी
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातून वाहणाऱ्या शास्त्री, सोनवी आणि बावनदीने धोकादायक पातळी गाठली असून पुराचे पाणी बाजारपेठांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी मुसळधार पावसाने संगमेश्वर बाजारपेठेतील रामपेठ, माखजन आदी बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले होते मात्र दोन दिवसानंतर हे पाणी ओसरले होते मात्र त्यानंतर पावसाची संततधारा सुरूच होती.
अधिक वाचा- महाड परिसरातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे बावनदी शास्त्री आणि सोनवी नदीने धोकादायक पाण्याची पातळी ओलांडली असून कधीही बाजारपेठांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहतूक ही मंदावली असून वाहन चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे तसेच महामार्गावरील मोऱ्याही धोकादक बनलेल्या आहेत खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्याचा धोका आहे वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.