ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. असे असतानाच गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांविषयी एक ट्विट केलं आहे. गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी गोडसेला बंदुक पुरवली, असा गंभीर आरोप तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी ट्विटमधून केला आहे.
तुषार गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली, असा गंभीर आरोप करत बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं,” असा दावाही तुषार गांधी यांनी केला आहे.
अधिक वाचा : नगरमध्ये ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार?
या ट्विटनंतर माध्यमांशी बोलताना गांधी म्हणाले, मी कोणताही आरोप करत नाही. इतिहासात जी नोंद आहे, त्याप्रमाणे ट्विट केले आहे. 26, 27 जानेवारी 1948 च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले होते. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबईत फिरत होता. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्लीला आणि तेथून ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरला त्यांनी सावरकवादी असणाऱ्या परचुरेंची भेट घेतली. यानंतर त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी हे सर्व घडले. पोलिसांच्या एफआयआरमध्ये ही नोंद आहे.