जळगाव / प्रतिनिधी :
शिंदे-फडणवीस सरकारवर अजूनही न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार आहे. न्यायालय काय निकाल देते, यावर त्या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. त्यात मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता वाढली तर सरकार कधीही कोसळेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
नागपूर अधिवेशनात आपल्याला अडकवणारे आणि बदनाम करणारे आपल्याच पक्षातील आहेत, असे विधान अब्दुल सत्तार यांनी केले. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सध्या जे मंत्री आहेत, ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत आहेत. सत्तार यांच्या बोलण्यातून हे दिसून येते. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी हे नेमके कोण मंत्री आहेत, ते देखील स्पष्टपणे सांगून टाकावे.
अधिक वाचा : मुख्यमंत्र्यांकडे 6 बंगले कसे?; सोमय्याजी यावरही बोला…
मंत्र्यांची एकमेकांवरची कुरघोडी आणि न्यायालयाची टांगती तलवार यामुळे मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे, ही वाढली तर सरकार कोसळू शकते, असा दावा त्यांनी केला.