ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Speed limit fixed at 120 kmph on Samriddhi Highway समृद्धी महामार्गावरील वाहनांची वेगमर्यादा 120 किमी राहणार आहे. तसेच या महार्मावर दुचाकी व तीनचाकी वाहनांना प्रवेश नसेल. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कुलवंत सारंगल यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी असे असतील वेगमर्यादेचे नियम :
8 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनांसाठी समतल भागांत 120 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 100 कि. मी. प्रति तास.
9 किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी समतल भागांत 100 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 कि. मी. प्रति तास.
माल आणि सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी समतल भागांत 80 कि. मी. प्रति तास तर घाट आणि बोगद्यांमध्ये 80 कि. मी. प्रति तास. दुचाकी व तीनचाकी वाहनांना या महामार्गावर प्रवेश नाही.
अधिक वाचा : राज्यात ‘यलो अलर्ट’
नागपूर-मुंबई प्रवास सुलभ व्हावा यासाठी 701 किमीचा समृद्धी महामार्ग बांधण्यात येत आहे. सध्या 16 टप्प्यात या महामार्गाचं काम सुरू आहे. अधिग्रहण आणि कोरोना काळातील लॉकडाऊन यामुळे या महामार्गाचं काम मागे पडल्याचं सांगितलं जातं. मात्र, आता महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे.