ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघात पंढरीनाथ आंबेरकर याने जाणीवपूर्वक घडवून आणल्याची कबुली राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात वारिशेंच्या अपघाती मृत्यूबाबत विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारला. यावेळी राज्य सरकारने लेखी उत्तर देत याबाबत कबुली दिली आहे. काही दिवसांपूर्वी राजापूरमध्ये एका गाडीने शशिकांत वारिसे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली होती. यात वारिशे गंभीर जखमी झाले झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने जाणीवपूर्वक हा अपघात घडवून आणला. त्याने वारिशेंच्या हत्येचा पूर्वनियोजित कट रचला होता. या प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे.
अधिक वाचा : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघे जागीच ठार
दरम्यान, यापूर्वी या प्रकरणातला आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यानेही वारिशेंचा अपघात पूर्वनियोजित असल्याची कबुली दिली होती.