ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Suspected measles patients has crossed ten thousand महाराष्ट्रात गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या दहा हजारांपार गेली आहे. मुंबईच्या गोवंडी परिसरातून गोवरच्या उद्रेकाला सुरूवात झाली. त्यानंतर ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगाव, पनवेल, वसई, विरार या भागातही गोवरचा धोका वाढला होता. आता संपूर्ण राज्यात या आजाराची स्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात 10,234 गोवरच्या संशयित रुग्णांची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागाकडे झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.
गोवर हा एक संसर्गजन्य आजार असून लहान मुलांना त्याची लागण होते. गोवरचा वाढता धोका लक्षात घेता स्थानिक परिस्थितीचे अवलोकन करुन लसीकरणाचा निर्णय घेण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहे. ज्या भागांमध्ये सहा महिने ते नऊ महिन्यांपेक्षा लहान बाळांमध्ये गोवर रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल, अशा भागामध्ये सहा महिने ते नऊ महिन्यांहून लहान वयांच्या बाळांमध्ये गोवर आणि रूबेला लसीची एक अधिकची मात्रा देण्यात यावी.
अधिक वाचा : निवडणूक ड्युटीवरील CRPF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू
तसेच जिल्हा/ उपजिल्हा टास्क फोर्सच्या बैठका, उदेक झालेल्या भागांत विशेष लसीकरण, अतिजोखमीच्या भागांना प्राधान्य, बालवाडय़ा-पाळणाघरात लसीकरण इतिहास तपासणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील गोवर संशयित रुग्णांची संख्या 10 हजार 234 असून, त्यामधील निश्चित झालेले रुग्ण 658 आहेत. त्यामधील आतापर्यंत एकूण 13 मृत्यूंची नोंद झाली असून, त्यातील 9 संशयित आहेत, चार मृत्यूंची गोवर निश्चिती झाली आहे.