ऑनलाईन टीम/तरुण भारत
ईडीकडून देशभरात जोरदार कारवाई सुरु आहे. तर मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, ईडीने महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालकडे आपला मोर्चा वळविला आहे. शिक्षण भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mmamata Banerjee) यांच्या निकटवर्तींच्या ठिकाणांवर छापेमारी करत त्यांना अटक केली आहे.
दरम्यान, शिक्षण भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तींच्या १३ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यावेळी निकटवर्तीच्या घरातून सुमारे २० कोटींची रोकड जप्त केली आहे. पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी (Partha Chatterjee) यांचे निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांच्या घरातून ही रोकड ईडीने जप्त केली आहे. ही रोकड इतक्या मोठ्याप्रमाणात होती की ईडीने बँकेचे अधिकारी बोलावले आहे. याशिवाय कारवाईत ईडीने अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून रोकडसह जवळपास २० मोबाईल जप्त केले आहेत.
हे ही वाचा : शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? पुरावे सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश; तर राऊतांनी दिली पुराव्यांची यादी
गेल्या काही दिवसांपासून शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी ईडीकडून पार्थ चॅटर्जी यांची चौकशी सुरू होती. चॅटर्जी यांच्या घरावरही ईडीने छापा मारला. पण त्यात फारसे काही सापडले नाही. मात्र चौकशीदरम्यान चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता यांच्याघरावरही ईडीने छापा मारला असता त्यात २० कोटींहून अधिक रक्कम आणि महत्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले. यादरम्यान चॅटर्जी यांना ईडीच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. तसेच उत्पन्नाचे स्त्रोतही दाखवण्यात आले नाही. त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली.
नेमके काय आहे प्रकरण
पार्थ चॅटर्जी यांच्यावरील ईडी कारवाईचा थेट संबंध हा २०१६ मधील शिक्षक भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याशी आहे. या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पद्धतीने नापास उमेदवारांना प्रवेश देण्यात आले होते. त्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार करण्यात आला. यासाठी लाखो रुपयांची लाच घेण्यात आल्याचा आरोप आहे. यात थेट शिक्षणमंत्र्याचाच सहभाग होता. यासाठी त्यांना अजून काही मंत्र्यांचीही साथ होती असेही ईडीच्या माहितीतून समोर आले आहे. यामुळे चॅटर्जींनंतर ममता सरकारमधील अजून काही मंत्र्यांवर अटकेची तलवार लटकली आहे.
हे ही वाचा : राज्य सेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम जाहीर