ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री (Dy CM Devendra Fadnavis) झाले. मात्र राज्यत सत्तांतर होऊन महिन्यांपेक्षा अधिकचा कालवधी उलटला असली तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सध्या राज्याचा कारभार चालवताना दिसत आहेत. यावरून विरोधक जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देखील सध्या दिल्लीतच असून, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पोहोचताच केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसीय दिल्ली (Delhi)दौऱ्यावर गेले आहेत. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी हा दौरा मंत्रीमंडळ विस्ताराबाबत नसल्याचं सांगितलं. ते दिल्लीत विमानतळावर पोहचल्यावर माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : अस्लम शेख यांना पर्यावरण मंत्रालयाची नोटीस
दिल्ली दौऱ्याचा आणि मंत्रिमंडळाचा काहीच संबंध नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून, त्यासाठी कोणताही अडथळा नाही. मंत्रिमंडळ विस्ताराला पुढचा आठवडा कशालाा लवकर होईल, असे वक्तव्य शिंदे यांनी केले आहे. तसेच दिल्लीत होणारी बैठक शासकीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवबाबत बैठक ठेवली आहे आणि उद्या नीती आयोगाची बैठक आहे. मुख्यमंत्र्यांसोबतची ही बैठक दरवर्षी होते. या दोन्ही महत्त्वाच्या बैठका असल्याने मी दिल्लीला आलो आहे, असे ते म्हणाले.
हे ही वाचा : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार; हवामान विभागाकडून ९ ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट
“राज्यातील कोणतंही काम थांबवलेलं नाही. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घ्यायचे ते घेतले आहेत. ते काम कोठेही थांबलेलं नाही. लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल. पुढच्या आठवड्यापर्यंत मंत्रीमंडळ विस्तार होईल का? असा प्रश्न विचारला असता, पुढील आठवडा कशासाठी, त्याआधी मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं शिंदे म्हणाले.