ऑनलाईन टीम/तरुण भारत
‘राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका (Election) जाहीर झाल्या आहेत. परंतु या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत. उलट सत्तेला आलेल्या भाजपप्रणीत नवीन सरकारने लक्ष घालून मध्यस्थी करावी’, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केल्यांनतर आज अजित पवारांनीही (Ajit Pavar) ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत असं म्हणत आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Riservation) निवडणुका नकोत, इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम पूर्ण झालं आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणालेत. अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्या धर्तीवर माध्यमांनी अजित पवार यांना निवडणुकीबाबत प्रतिक्रीया विचारली. तेव्हा अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले आणि ओबीसी आरक्षण हवेच मग निवडणुका व्हाव्यात. निवडणुका लढण्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांशी, चर्चा करून राज्यस्तरावरील निर्णय घेऊ असेही अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा: पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट; लवकरच समोर येतील
ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीची भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो की, निवडणुका होत असताना ओबीसी समाजाच्या संदर्भातलं जे प्रतिनिधित्व आणि आरक्षण आहे ते मिळालं पाहिजे ते आरक्षण न देता या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टात प्रकरण असून, १२ तारखेला सुनावणी आहे. आता इम्पेरिकल डेटासंदर्भात बरेचसं काम झालेले आहे. बांठियांच्या अध्यक्षतेखाली समिती होती, त्यांनी ते काम मध्य प्रदेशच्या धर्तीवर केलेले आहे. १२ तारखेला सुप्रीम कोर्टानं ते मान्य करायला हवं. मध्य प्रदेशचं मान्य केलंय, तर महाराष्ट्राचंही मान्य करायला हवं, अशी आमची अपेक्षा आहे. त्या निवडणुका ओबीसींना प्रतिनिधित्व देऊनच लावाव्यात. नाही म्हटलं तरी २२ तारखेपासून फॉर्म भरायचे आहेत. मधल्या काळात ठरवलं तर निवडणूक आयोग ते करू शकतं. ते करावं अशी आमची रास्त मागणी असल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय.
उद्याचा निर्णय महत्वाचा
शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उद्या न्यायालयात निकाली निघण्याची शक्यता आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, राज्यात वेगाने राजकीय घटना घडल्या. स्थित्यंतरे घडली. त्यातून कायदा, पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो? हे पाहून विधितज्ज्ञ भूमिका मांडतात. उद्याच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
हे ही वाचा: Ratnagiri; बनावट दागिने विकून फसवणूक करणारी टोळी गजाआड